सावित्री रामचंद्र गवळी वय वर्ष 95 ही वयोवृद्ध महिला राहणार मुक्काम टाळगाव तालुका कराड जिल्हा सातारा या शेतात एकट्याच राहत होत्या व त्या एका हाताने अधू सुद्धा होत्या ग्रामपंचायत ने सदर महिलेचा पाण्याचे कनेक्शन कुठलीही पूर्वसूचना न देता कट केले व मागील आठ महिन्यापासून सदर महिलेच्या मुलाने ग्रामपंचायतीकडे अनेक अर्ज केले पण ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत होती जागृत महासंघाकडे ही तक्रार आल्यानंतर सदर ग्रामपंचायतीला माहिती अधिकार कायदा काय असतो हे फक्त फोनवर सांगितले आणि गंमत दोनच दिवसात सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा मला फोन आला आणि सांगितले की सदर महिलेचे पाणी कनेक्शन पूर्ववत करण्यात आलेले आहे या ठिकाणी माहिती अधिकार कायद्याचा अर्ज सुद्धा केला नाही फक्त कायदा समजावून सांगितला